शालिमार वरून चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्सप्रेसला उडीसा येथील बालासोर मधील बहनागा स्टेशन अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत २८० हून अधिक प्रवासी मृत पावलेत तर हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. जवळपास ९०० प्रवासी जखमी झाले आहेत.
मालगाडीशी टक्कर झाल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जातंय. या अपघातामुळे ट्रेन चे अनेक डब्बे रुळावरून घसरले आहेत.
सरकारने मृतांसाठी १० लाख रुपये तर गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित केली आहे.
संबंधित छायाचित्रे :