नागापूरमधील कौलापौड येथील पिण्याच्या पाण्याच्या विहीरीत कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत, सरपंच, उपसरंच याकडे दुर्लक्ष करत आहेत.
विहिरीतील दूषित पाणी पिऊन ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच रोगराई पसरण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
गावातील ग्रामपचायतीतर्फे लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्याची मागणी गावकऱ्याकडून होत आहे.
संबंधित छायाचित्रे :