आज सर्वत्र विचार केला तर अनेक व्यक्तींवर अनेकानेक कारणास्तव सिंगल / त्याचप्रमाणे अविवाहित जीवन जगण्याची वेळ आली आहे. प्रामुख्याने अशा प्रकारे जीवन जगणाऱ्या व्यक्तीजवळ स्वतःचे चारितार्थ चालविण्यासाठी नोकरी नाही. त्यामुळे जगणे मुश्किल असते. हाच दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून समाजात खऱ्या अर्थाने समजून न घेता, सहकार्याची भावनेचा पूर्णपणे अभाव इत्यादी अनेकानेक कारणास्तव त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच असतो. तर मग अशा पद्धतीने जीवन जगणाऱ्या व्यक्तींनी दाद कोणाकडे मागायची ? हा मोठा प्रश्न आहे.
तरी सदर अशाप्रकारे जीवन जगणाऱ्या व्यक्तींनाही उदरनिर्वाहासाठी शासनाने त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवाव्यात. तसेच सदर वर उल्लेख केल्याप्रमाणे कोणताही निकष न लावता मानधन सुरू करावे. जेणेकरून त्यांना समाजात स्वाभिमानाने जगता येईल. तरी याबाबत शासनाने तात्काळ दखल घेवून सिंगल त्याचप्रमाणे अविवाहित जीवन जगणाऱ्या व्यक्तींना दैनंदिन जीवन जगण्यास बळ द्यावे अशी आशा बाळगतो.
तरी याबाबत स्वारस्य असणाऱ्यांनी आपले मनोगत / सूचना श्री. प्रमोद पाटील जळगाव. मो.नं. ९३२६३५९२२९ येथे कळवाव्यात असे आवाहन करण्यात आलेले आहे.
संबंधित छायाचित्रे :