प्रतिनिधी :-दिलीप निकम
पॅरिस : भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले…भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले आणि यावेळी सर्वांच्या नजरा वळल्या त्या पीआर श्रीजेशकडे. कारण श्रीजेशचा हा अखेरचा सामना होता. त्यामुळे त्याला भारताने कांस्यपदकाची अविस्मरणीय भेट दिली. भारताने सामना जिंकल्यावर श्रीजेशने जी एक कृती केली, त्यामुळे सर्वांचीच मनं त्याने जिंकली. आपल्या या कृतीमधून त्याने भारताचे संस्कार दाखवून दिले.
भारताने विजय मिळवला आणि श्रीजेशने त्यानंतर चक्क गोलपोस्टला नमस्कार केला. श्रीजेशने यावेळी गोलपोस्टसनोर दंडवत घातले. सर्वांसाठीच हा एक भावूक क्षण होता. कारण श्रीजेशने ज्या एका कृतनीने आपली भावना व्यक्त केली. त्यामधून सर्वांनाच भारताची संस्कृती नेमकं काय शिकवते, हे सर्वांना समजले. आपल्या या अखेरच्या सामन्यात श्रीजेशने अखेरच्या मिनिटाला पेनेल्टी कॉर्नर अडवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कारण अखेरचे मिनिट भारतासाठई सर्वांत महत्वाचे होते. त्यामुळे श्रीजेशने अखेरच्या मिनिटात जो बचाव केला, त्याला तोडच नव्हती.