मुरबाड तालुक्यातील मालशेज घाटावर करोडो रुपये खर्चून सुद्धा अपघाताचे प्रमाण वाढत चाललेले आहे. वारंवार या रस्त्यावर अपघात होत आहेत. या रस्त्यावरील वळण धोकादायक असल्याने शासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे.
आज देखील माळशेज घाटात ट्रक आणि बस चा भीषण अपघात झाला. बस ट्रक वर आदळून रस्त्याच्या बाजूच्या गटारात पडली. यावेळी काही प्रवाशांना दुखापत झाली आहे. सरकारने वेळीच उपायोजना केली नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो.
संबंधित छायाचित्रे :