कोकणातील गणपतीच्या तिकिट बुकिंगमध्ये काळा बाजार होत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. तिकिटे अवघ्या १ मिनिटाच्या आत फुल्ल झाल्याने गणपतीला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते मा. अजितदादा पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री मा. अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणली आहे. व यात लक्ष घालून सखोल चौकशी करून दलालांवर चाफ लावन्याची विनंती केली आहे.
संबंधित छायाचित्रे :